मुंबई शहर व उपनगर जिल्हयातील झोपडपट्टी वसाहतीमध्ये राहाणार्‍या नागरिकांचे राहणीमान प्राकृतिकदृष्टया सुधारण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने नोव्हेंबर १९९२ मध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाची स्थापना केलेली आहे.मुंबई शहर व उपनगर जिल्हयातील झोपडपट्टी वसाहतीमध्ये रहाणार्‍या नागरिकांना मुलभूत नागरी व सामजिक सुविधा पुरविण्याची कामे या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळामार्फत केली जातात. हि कामे प्रामुख्याने जिल्हा वार्षिक योजनांतर्गत प्राप्त होणार्‍या निधीतून केली जातात.