पार्श्वभूमी
म्हाडा अधिनियम १९८१ अंतर्गत विनिमय २१(६) अन्वये म्हाडाच्या मालकीच्या इमारतींचे अभिहस्तांतरण करण्यात येते. मुबंई मंडळाच्या अखत्यारितील अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट, औद्योगिक कामगार, आर्थिक द्रुष्टया दुर्बल, उच्च उत्पन्न गट इत्यादि विविध योजना अंतर्गत वसाहतीतीतल्या इमारती /चाळीतील पात्र रहिवाश्यांना वितरीत केलेले आहेत.
उपरोक्त इमारतीतल्या रहिवाश्यांनी एकत्रित येऊन सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करुन त्याचे अभिहस्तांतरण मुंबई मंडळाकडून केले जाते.
अभिहस्तांतरणाची सद्यस्थिती
मुंबई मंडळाच्या ५६ वसाहतीतील ३७०१ इमारती, १,११,६५९ /- गाळे पैकी १७३७ इमारती, ४५,१६१ गाळयांचे अभिहस्तांतरण झाले असून १९६४ इमारती ६६,४९८ गाळ्यांचे अभिहस्तांतरण व्हायचे.
महाराष्ट्र शासनाचे गृहनिर्माण धोरण
मा.मुख्यमंत्री मा.विलासराव देश्मुख, महाराष्ट्र राज्य यांनी म्हाडाच्या जुन्या इमारतींना २००७ च्या अर्थ संकल्प अधिवेशनात घोषणा केल्यानुसार वाढीव चटई क्षेत्र समान पध्दतीने वाटपाचे धोरण जाहिर केले आहे. यामुळे म्हाडाच्या जुन्या वसाहतीच्या पुनर्विकासास गती मिळणार आहे.पुनर्विकास करावयाचा झाल्यास इमारतींचे अभिहस्तांतरण करणे अत्यंत गरजेचे आहे.
अभिहस्तांतरणाचे सुलभीकरणासाठी म्हाडाने केलेली उपाययोजना ०५/०९/०८ चे परिपत्रक