पार्श्‍वभूमी


प्राधिकरणाच्या स्थापनेपूर्वी म्हाडा हि संस्था "बाँम्बे हाऊसिंग बोर्ड" या नावाने ओळखली जात होती, व या भारतातील पहिल्या गृहनिर्माण संस्थेची स्थापना १९४९ साली त्यावेळेच्या मुंबई इलाक्याचे कामगारमंत्री श्री. गुलझारीलाल नंदा यांनी केली. या संस्थेच्या अधिपत्याखाली विदर्भ वगळता संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील गृहनिर्माणाचा कार्यक्रम राबविला जात होता.